|
|  |
 | नैसर्गिकतेला बाधा आणू नका - अजित घोरपडे सावंतवाडी, ता. ४ - जिल्ह्याचा पर्यटन विकास झालाच पाहिजे; मात्र पर्यटनाच्या
नावावर मोडतोड करून नैसर्गिकता घालवू नये, असे आपले शासनाला साकडे आहे, असे मत
माजी पालकमंत्री अजित घोरपडे यांनी आज येथे केले. |
उमेश शेट्येंवर अपात्रतेचा वार? रत्नागिरी, ता. ४ - राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नगरसेवकांकडून उमेश शेट्ये यांना शह
देण्यासाठी जोरदार हालचाली आजही सुरू आहेत. |
शिवसेनाप्रमुखांचे स्वप्न साकार करणार - उदय बने रत्नागिरी, ता. ४ - जिल्हा परिषदेत तीन वेळा निवडून आल्याने जिल्हा परिषदेच्या
काराभाराचा चांगला अनुभव आहे. या अनुभवाच्या बळावर, नेत्यांच्या आणि माजी
सभापतींच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या योजनांमध्ये सर्वसमान्यांच्या समस्यांना
न्याय देताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांचे स्वप्न सत्यात उतरविण्याचा प्रयत्न
करणार, अशी प्रतिक्रिया उदय बने यांनी उपाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकरताना व्यक्त
केली. |
मियॉंसाब समाधीबाबतची अपिले फेटाळली सावंतवाडी, ता. ४ - येथील सद्गुरू मियॉंसाब समाधीसंदर्भात सद्गुरू मियॉंसाब भक्त
मंडळासह चौघांनी दाखल केलेली दिवाणी अपिले जिल्हा न्यायालयाने फेटाळून लावली आहेत.
याकामी कब्रस्तान ट्रस्टच्या वतीने ऍड. सत्तार डिंगणकर यांनी काम पाहिले. |
ग्रीनहाऊस मालकांना हवी आहे कर्जमाफी खेड, ता. ४ - कोकणातील ग्रीनहाऊसच्या माध्यमातून शेतीमध्ये सुधारणा करण्याचा
प्रयत्न केलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी योजनेचा लाभ मिळावा, अशी अपेक्षा व्यक्त
केली आहे. |
"खबरीलाल'चे नेटवर्क कोलमडले रत्नागिरी, ता. ४ - "नमश्कार मैं खबरीलाल बोल रहा हूँ, आज का ताजा समाचार ये है
की'..., अशा प्रकारचे खबरीलाल आपण चित्रपटातच पाहतो. |
सिंधुदुर्गसाठी आलेला गहू निकृष्ट ओरोस, ता. ४ - रास्त दराच्या धान्य दुकानात वितरित करण्यासाठी शासनाकडून आलेला लाल
गहू माणसाला खाण्यास अयोग्य असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. |
|
|  |
|